मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारने ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्यात सध्या यश मिळवलं असलं, तरी हा ‘आगीशी खेळ’ ठरू शकतो. पण त्याची पर्वा कोण करतो!

रडणाऱ्या पोराला चॉकलेट देऊन समजूत काढली की, पोरगा खुश आणि तो गप्प बसला म्हणून चॉकलेट देणाराही खुश, अशी काहीशी अवस्था मराठा समाजाचे ‘नवीन योद्धा’ मनोज जरांगे आणि ‘मराठ्यांचे तारणहार’ म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याच्या धडपडीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली आहे. हे दोघं मराठा समाजासोबत स्वतःचीही फसवणूक करून घेत आहेत. प्रत्यक्षात सरकारनं मराठा समाजाची बोळवणच केली आहे.......

गिरीश कुबेरांचं पुस्तक ‘भारतात जात्यान्तक लोकशाही क्रांती होऊ न देण्याच्या’ प्रयत्नांचाच एक भाग आहे, असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं!

क्रांतीबा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज ते अगदी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांच्यापर्यंत कुबेर कोणाचीच दखल घेत नाहीत, यात आश्चर्य काहीच नाही. कारण हे पुस्तक त्यासाठी लिहिलेलंच नाही. मुळात ही परंपरा आणि हे योगदान नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. असे प्रयत्न पूर्वीही झालेले आहेत आणि यापुढेदेखील काही लोक ते करतच राहतील. मात्र आता बहुजन या ब्राह्मणी षडयंत्राला बळी पडत नाहीत.......